Friday, February 9, 2024

विशेष लेख

 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पर लेख

       :श्री. मंगलप्रभात लोढा,

मंत्री,कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा पालकमंत्री मुंबई उपनगर

 

       सर्वसमावेशक नेतृत्व

 

शांत, संयमी, दृढ निश्चयी स्वभाव आणि तळागाळातील जनतेविषयी मनात असलेली संवेदनशीलता जपून, सर्वसमावेशक नेतृत्व असलेले  माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

 नेतृत्व आणि कर्तुत्व कोणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःच निर्माण करावे लागते. नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या उंची गाठत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमणा  केली आणि पुढेही सुरू ठेवतील. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजोपयोगी कामे केली. पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशील जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. अगदी अलीकडेच प्रसारित झालेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीची आपल्याला नव्याने ओळख होते.अगदी चित्रपटाला साजेशी अशी त्यांची संपूर्ण कारकीर्द आहे.

ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही. २०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले.  

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिलेल्या भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. कोणत्याही प्रकल्पाची फक्त घोषणा करून उपयोग नसते तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन जनतेला त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होणं गरजेचे असतं आणि हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शांत संयमी मनाने आणि दृढ निश्चय असलेल्या स्वभावाने करून दाखवले आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम  असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. राज्याला प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र गावागावात सुरू करणे,आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी तरूणांना उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राची स्थापना,राज्यातील पारंपारिक कारागिरांना आणि हस्तकलाकारांना  आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणारी पी.एम.विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी, अकरा कलमी नमो उपक्रमातंर्गत नमो महारोजगार  मेळावे,रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करून रोजगार क्षम आणि कुशल महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकावयास मिळत आहे.

महाराष्ट्राला सुखी, समृद्ध आणि संपन्न राज्य करण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...