Friday, October 26, 2018


नारी शक्ती पुरस्कारासाठी
नामांकने सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 26 :-  भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 8 मार्च, 2019  या जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी औरंगाबाद महसुली विभागातील आठ जिल्ह्यातून नामांकने मागविण्यात येत आहेत. यामध्ये वैयक्तीक पुरस्कार व स्वयंसेवी संस्था स्तरावरील पुरस्काराचा समावेश आहे. नामांकने सादर करण्यासाठी आवश्यक पात्रता, निकष व नमुना अर्ज इत्यादीची माहिती केंद्र शासनाच्या http//www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेंव्हा यासाठी औरंगाबाद विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात दि.  29 ऑक्टोबर, 2018 पर्यंत संबंधितांनी नामांकने सादर करावीत. त्यानंतर प्राप्त झालेली नामांकने, अर्ज स्वीकारली जाणार नाहीत, असे विभागीय उपआयुक्त, महिला व  बालविकास, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...