Wednesday, September 6, 2023

विशेष लेख ‘शासन आपल्या दारी’अभियानाने झाला आरोग्याचा जागर

 विशेष लेख                                                                                                      दि. 5 सप्टेंबर 2023

शासन आपल्या दारीअभियानाने झाला आरोग्याचा जागर

राज्य शासनाच्यावतीने राज्यातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु त्या योजना गरजू पर्यत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असतो. सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकांपर्यत त्यांच्यासाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यत पोहोचाव्यातया हेतुने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही  25 जून रोजी या अभिनव उपक्रमाचे अबचलनगर येथील मैदानावर यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते.

सर्वसामान्य माणसाला बऱ्याचवेळा त्याच्या हक्काच्यातो ज्या योजनेला पात्र आहे त्या-त्या योजनांचे निकषही त्याला माहिती नसतात. अशावेळी राज्यातील वाडी-वसतीवर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यत या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासन पोहचले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना त्यांच्या हक्काच्या योजनांची माहिती देण्यात येवून अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमास जनतेचा ही उत्स्फूत प्रतिसाद मिळत असून लाखोच्या संख्येने नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. या उपक्रमात विविध घटकांच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळया विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनाचा यात समावेश आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया योजनाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील आत्माराम घाटे या लाभार्थ्यांने सांगितले कीमला अनेक महिण्यापासून पोटाचा त्रास होता. मग मी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयविष्णुपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालो. येथील डॉक्टरांनी माझी तपासणी केली. त्या तपासणीत माझी डावी किडणी पूर्णपणे निकामी झाल्याचे निदान झाले. निदान झाल्यामुळे किडणी काढून टाकणे गरजेचे होते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून माझी किडणी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मला आता या शस्त्रक्रियेमुळे बरे वाटत असून मला सध्या कुठलाही त्रास नसून मी पूर्वीसारखेच दैनंदिन कामे करु शकतो असे आत्मारामम घाटे या लाभार्थ्याने सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे राहणाऱ्या श्रीमती वाघमारे यांच्या पापणीवर गाठ आली होती. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले परंतु त्यांना आजाराचे निदान होत नव्हते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना योग्य ते मोफत उपचार मिळाले. त्यांच्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ‘ मला सुरुवातीला डोळयाच्या पापणीला गाठ आल्यानंतर माझ्या कुटूंबियांनी मला अनेक ठिकाणी उपचारासाठी दाखविले. परंतु नेमके आजाराचे निदान होत नव्हते तसेच त्यांना खर्च ही खूप सांगण्यात येत होता. यामुळे मी व माझे कुटुंबीय हताश झालोत. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागात आम्ही उपचारासाठी दाखविले. तपासणीअंती वरच्या पापणीला जी गाठ आली होती ती कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. ही शस्त्रक्रिया डॉक्टरानी अत्याधुनिक पध्दतीने करुन पापणीचे प्रत्यारोपण केले. यामुळे माझ्या चेहऱ्यावर कुठेही विद्रुपता आली नाही जी अशा शस्त्रक्रीयेनंतर येते. शस्त्रक्रियेनंतर सूजगाठ कमी झाली असल्याचेही श्रीमती वाघमारे यांनी सांगितले. या उपचारामुळे मी पहिल्यासारखी दैनंदिन कामकाजात कार्यरत आहे. याबाबत त्यांनी राज्य शासनाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. श्रीमती वाघमारे यांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अगदी मोफत झाली आहे. जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपातील ही दोन उदाहरणे प्रत्येक गावातील लाभ धारकांसारखीच आहेत. या योजनेत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी उपचार घेत आहेत.

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...