Tuesday, December 13, 2022

नदी साक्षरतेसाठी सर्व संबंधित विभाग

नदीगटांसमवेत मिशन मोडवर घेतील सहभाग   

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

   चला जाणूया नदीला अभियानाची आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- चला जाणूया नदीला अभियान नदीसाक्षरतेच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्वाचे आहे. नदीची मालकी ही प्रत्येकाची असून जिल्ह्यातील मांजरा, लेंडीमन्याडआसनापैनगंगासिताकयाधू या नदीवर पूर्वीपासून अनेक अनुभवी संस्था काम करत आहेत. या संस्थासमवेत कृषिसिंचनमृदसंधारणसामाजिक वनिकरणतहसिलपंचायत समिती आदी तालुका पातळीवरील कार्यालय प्रमुखांनी मिशनमोडवर यात आपला सहभाग दिला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

 

चला जाणुया नदीला अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी केशव वाबळे, सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुखजयाजी पाईकरावबालासाहेब शेंबोलीकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेनांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता अशिष चौगलेलेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वि. पा. तिडके, कार्यकारी अभियंता अभय जगताप, भूजल संरक्षण विकास यंत्रणाचे शिवकिरण धाडेसहयोगी प्राध्यापक डॉ. एन. एच. कुलकर्णीमांजरा नदी समन्वयक दिपक मोरताळे, कयाधु नदी समन्वयक दयानंद कदम, यादव बोरगावकर, कैलाश येसगे, वसंत रावणगावकर, शिवाजी देशपांडे, आसना नदी समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

लोकांच्या मनात आपल्या गाव कुसातून वाहणाऱ्या नदीप्रती नेमक्या कोणत्या भावना आहेत हे या अभियानाच्या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. याचबरोबर नदीच्या स्वास्थाबाबत व पर्यावरण संतुलनाबाबत ते कोणत्या पद्धतीने आवडीनुसार मदत करण्यास तत्पर आहेत हेही जाणुन घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात आपल्या गावशिवारात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी जो पर्यंत आस्था निर्माण होणार नाही तो पर्यंत त्यांचा कृतीशील सहभाग यात घेता येणार नाहीअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

 

चला जाणुया नदीला या अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या मदतीला व कार्याला सहकार्य व्हावे या उद्देशाने त्या-त्या नदी गटाप्रमाणे तालुकास्तरीय वेगळी उपसमिती नेमून त्यात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह शैक्षणिकसामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सहभागी करून घेतले जाईलअसे त्यांनी स्पष्ट केले. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शालेय पातळीवर निबंध स्पर्धाएनएसएसएनसीसीस्काउट आदी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल. विद्यार्थ्यांच्या मनातही नदीचे नेमके आरोग्य कसे आहे याची उकल व्हावी व शालेय शिक्षणापासूनच नदीप्रती आस्था निर्माण व्हावी यादृष्टिने नदी सहलींचे आयोजन करण्याबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले जातीलअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी आसना नदीचे समन्वयक  डॉ. परमेश्वर पौळ यांनी सचित्र सादरीकरण करून आसना नदीगटाने केलेल्या कामाचा आढावा सादर केला. अधिकाधिक लोकसहभाग घेण्यासाठी आध्यात्मिक व लोकांच्या भावनांशी जुळलेल्या माध्यमातून पोहचण्याचे नियोजन त्यांनी सादर केले. वसंत रावणगावकर यांनी लेंडी नदीबाबत तर मन्याड नदीबाबत शिवाजी देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. दिपक मोरताळे यांनी नदी प्रदुषणावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

00000 









No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...