Wednesday, March 10, 2021

 

दुष्काळग्रस्त / टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजनेबाबत आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सन 2017-18 व 2018-19 मधील खरीप हंगामातील / दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या / पालकाच्या आधार संलग्न बॅक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.   

तसेच सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता दहावीसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://feerafund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...