Wednesday, July 1, 2020


वृत्त क्र. 597
 जिल्हा परिषदेत कृषि ‍दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका) दि.  1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हयातील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या समवेत विविध फळ पिकांची  रोपे जसे चिंच, पेरु, लिंब, आवळा इत्यादी देवून नाविन्यपूर्ण पध्दतीने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या संकल्पेनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मगाराणी अंबुलगेकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर,  महिला बालकल्याण सभापती सौ. सुशिलाताई बेटमोगरेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राविशंकर चलवदे, माजी कृषि संचालक सुरेश अंबुलगेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल ठोंबरे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, कार्यकारी अभियंता श्री. रायभोगे, जि. प. सदस्य सौ. प्रणिताताई देवरे, श्री. शिंदे, बास्टेवाड, के. सी. सुर्यवंशी, श्री. सरोदे, श्री. मोरे, श्री. कल्याणे, श्री. सावतकर  उपस्थितीत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी शेती व्यवसाय हा पुर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याचे सांगून त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी कराव असे मार्गदर्शन केले. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा परिषद र्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.  
प्रास्ताविकात कृषि सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी कृषि पशुसंवर्धन विभागामार्फत नव्याने राबविण्यात येणाऱ्या सद्यस्थितीत चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना रोजगार हमी योजनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. सुरेश अंबुलगेकर यांनी शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टीकोन पुढे ठेवून शेती केली पाहिजे असे सांगितले. कृषिभुषण शेतकरी रामराव कदम यांनी कै. वसंतरावजी नाईक यांच्या मंत्रीमंडळातील स्वर्गीय शंकराव चव्हाण यांनी राबविलेल्या सिंचन योजनामुळेच संपुर्ण महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम झाला असल्याचे सांगितले.
विद्यापीठ शास्त्रज्ञ श्री पांडागळे यांनी  विविध तणनाशकाचा कार्यक्षम वापर याविषयावर माहिती  दिली. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि दिन बांधावर करण्याची विनंती केली. किटक शास्त्रज्ञ शिवाजीराव तेलंग यांनी विविध किटक, त्यांच्या अवस्था, किटकनाशकाचा कार्यक्षम वापर गुलाबी बोंडअळी नियंत्रण यावर सखोल मार्गदर्शन केले. मोनसॅन्टो इंडिया लि. सतिश काळवाघे यांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी आम्ही शासनासोबत काम करु असे सांगितले. फेरोमन ट्रॅपचा वापर करण्याची विनंती केली. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना किटक नाशकाची फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांच्या मार्गदर्शखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृ.अ. पुंडलीक माने तर आभार जि.कृ.अ. अनिल शिरफुले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृ.अ. संभाजी कऱ्हाळे, प्रभारी  मो.अ. गजानन हुंडेकर, संजय चंद्रवंशी, श्री. हाळे, श्री. कासराळीकर, श्री. चालीकवार यांनी परिश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...