Tuesday, April 21, 2020


रमजान महिन्यात नमाज पठण,
तरावीह, इफ्तारसाठी एकत्र येऊ नये
अल्पसंख्यांक विकास विभागाचे आवाहन  
          नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी रमजान महिन्यामध्ये नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र येऊ नये, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रसार होत आहे. यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम, 1897 लागू करण्यात आलेला यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तसेच भारतीय दंडसंहिता कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. दि. 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेन्वये व दि. 17 एप्रिल 2020 रोजीच्या सुधारित आदेशात यासंदर्भातील नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत दि. 14 मार्च 2020 च्या अधिसुचनेन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत वारंवार निर्देश दिलेले आहेत.
          नजीकच्या भविष्यात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग / सक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे असल्याने सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये सर्व मसाजबांधवांनी एकत्र येऊ नमाज अदा न करणे हितावह ठरणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रलायाचे मंत्री यांनी  16 एप्रिल 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मुस्लीम समाजात जनजागृती करण्यासाठी मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे सूचना देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुचना देण्यात याव्यात.
          कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे.
          कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.
घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी दिले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...