Friday, February 14, 2020

शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही
त्यांचे मुंबईत स्वतःचे घर नव्हते
          ---- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 14:-  माझे वडिल शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे होते. पण अतिशय प्रेमळही होते. सार्वजनिक जीवनात ते खूप पारदर्शी जीवन जगले. म्हणून दोन वेळा महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री राहूनही 1975 मध्ये त्यांच्याकडे मुंबईत स्वत:चे घर नव्हते . शेवटी आम्ही आमदार निवासात राहिलो, अशी आठवण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितली .
येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ही मुलाखत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतली. व्यासपीठावर अमिताताई चव्हाण याही उपस्थित होत्या. श्री. चव्हाण यांनी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
महाराष्ट्रासह केंद्रातही महत्वाची विविध मंत्रालय आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळलेले दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे सार्वजनिक जीवन कडकशिस्तीचे, कणखर बाण्याचे आणि कठोरपणे निर्णय राबवणारे असे होते. परंतु, घरात मात्र ते प्रेमळ तर  होतेच तसेच त्यांच्या हद् यात  एक हळवा कोपराही होता, असे सांगून श्री. अशोक चव्हाण व अमिताताई चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्री. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले . म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.     
श्री. चव्हाण म्हणाले की, जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती आणली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लावले. दुष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत मांडला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमर राजूरकर, अमिताताई चव्हाण, माजी मंत्री डि.पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नागरिक,पत्रकार आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वी भावे यांनी केले .  
0000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...