Friday, November 29, 2019


पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने  
सवलती लागू करण्याचा आदेश निर्गमीत
नांदेड दि. 29 :- ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या क्‍यार महा चक्रिवादळामुळे झालेल्‍या अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 562 गावांमध्ये विविध सवलती लागू करण्‍याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केला आहे.
             आदेशात म्हटले आहे की, ऑक्‍टोबर – नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या क्‍यार   महा चक्रि वादळाने झालेल्‍या अवेळी पावसामुळे विविध सवलती लागू करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे. त्यानुसार जिल्‍हयातील 16 तालुक्‍यात एकूण 1 हजार 562 गावामध्‍ये  अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍याने जमीन महसूलात सूट. शेतीपिकांच्‍या नुकसान झालेल्‍या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्‍कात माफी देण्याची सवलत लागू राहील.  शासनाच्‍या अनुज्ञेय या सवलती देण्‍याची व्‍यवस्‍था संबंधीत विभाग प्रमुखांनी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...