Saturday, May 5, 2018

व्यायामाची गरज – भाग २
तुम्ही जर सतत व्यायाम करीत असाल तर खूप सुंदर गोष्ट आहे. पण हाच व्यायाम योग्य पध्दतीने घेतला नाही तर हि एक चिंतेची बाब आहे. नियमित व्यायाम करणे, त्याचा वेग आणि वेळ वाढवणे उचित आहे. पण अतिरेक विपरीत परिणाम करु शकतो. योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती ही अनिवार्य आहे.
जास्त व्यायाम, म्हणजेच शरीराची अधिक पिळवणूक. ही पिळवणूक घातक ठरू शकते. जबरदस्तीचे शारिरीक आणि मानसिक ताण तुम्हाला आजारी करू शकतात. तुम्ही ‘ओवर ट्रेनिंग सिंड्रोम’ या आजाराने ग्रस्त होऊ शकता.
ओवर ट्रेनिंग सिंड्रोम कसे घातक असू शकते ते जुजबी शब्दांत मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
यकृतामधील साखरेसारखा पदार्थाचा साठा कमी होतो : यकृतामधील साखरेसारखा पदार्थ आपल्या शरीरातील ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे आपले स्नायू अधिक लवकर थकतात आणि आपल्याला अशक्त वाटते.
ताण हार्मोन्स : ताण  हार्मोन्स हे शरीरासाठी अपायकारक आहेत. ह्यामुळे व्यायाम करून सुद्धा वजन कमी होत नाही. ते शरीरातील चरबी धरून ठेवतात. शरीरातील सैनिक पेशी शत्रूपेशीशी लढू शकत नाही आणि आपली रोगप्रतिकारशक्ती खालवते. त्यामुळे विश्रांती न घेता जास्त व्यायाम, केला की आपण आजारी पडू शकता.
ह्दयावर ताण : ह्दयाची विश्रांती आणि काम करण्याची गती वाढते, त्यामुळे ह्दयावर ताण येतो आणि तो आपली क्रिया निट पार पाडू शकत नाही. रक्ताचे शुद्धीकरण निट होत नाही. या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कार्यक्षमता खालावते : कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अधिक प्रमाणात शरीराची झिज, आपली कार्यक्षमता कमी करते. सततचे व्यायाम आपल्या मांसपेशा, स्नायू आणि शरीराला कमजोर करतात. विश्रांती न घेतल्यामुळे नवीन मासपेशा तयार होत नाही. फक्त त्यांचा वापर आणि घासण होत राहते. परिणामी तुम्ही शरीराने आणि मनाने कमकुवत होता.
स्नायू झीज : रोजचा व्यायाम म्हणजे रोजच स्नायूची झीज. जेव्हा तुम्ही विश्रांती घेता, तेव्हा स्नायू स्वतःला पूर्ववत करण्यात रमतात. ते शरीरातील उर्जा वापरून परत कामासाठी सज्ज होतात. पण जर तुम्ही विश्रांती घेणे टाळले किंवा विश्रांती नाही घेतली तर ह्या सर्व प्रक्रियेत खंड पडतो. त्यामुळे तुम्हाला ताजे-तवाने वाटत नाही. शरीर खूप थकते आणि चिडचिड होते.
अशक्त वाटणे : मांसपेशी आणि स्नायू यांची जडण-घडण ही एक आवश्यक शारीरिक प्रक्रिया आहे. काम केल्याने मांसपेशी खर्च होतात आणि विश्रांती घेताच पूर्ववत होतात. पण अती वापर खरच त्यांना कमजोर बनवतात. शिवाय विश्रांती वगळल्यामुळे त्यांना पुर्ववत होता येत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे स्नायुंना आणि मांसपेशींना सूज. त्यामुळे तीव्र शारिरीक वेदना होत राहतात. शरीर संपत आहे अशी भावना निर्माण होते. मानसिकदृष्ट्या आपण कमकुवत बनता.
मानसिक तणाव : शरीर आणि मन हे दोघे खूप घनिष्ट मित्र आहेत. त्या दोघांचा एकमेकावर खूप परिणाम होतो. शरीर आजारी तर मन आजारी आणि मन दु:खी तर शरीर दु:खी. ह्याच तत्वामुळे शरीराची जास्त झिज झाली की मनाची झिज सुरू होते. आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्या प्रसन्न वाटत नाही. कुठल्याही गोष्टीत रस उरत नाही. सारखा ताण आणि राग येत राहतो.आपले मानसिक खच्चीकरण होते.
हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य व्यायाम आणि भरपूर विश्रांती, हा गुणमंत्र आहे. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहतील.तुम्हाला नवीन उर्जा मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
-सुजाता नाईकवाडे
**********

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...