Monday, April 30, 2018

कर्करोग रुग्णांची संख्या कमी करण्यात
जिल्ह्याचे काम कौतुकास्पद  - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- कर्करुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व जिल्हा कर्करोग नियंत्रण समारंभ कार्यक्रम डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोग निदानावर आरोग्य विभागामार्फत चांगले काम होत आहे. या आजारावरील निदानासाठी आरोग्य विभागाला आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांनी मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भ कॅन्सर या आजारावर योग्य वेळीच तपासणी करुन उपचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यानंतर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय वजिराबाद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री श्री कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आदींची  उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र. 378   आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार   बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार   जिल्ह्यामध...