Wednesday, April 11, 2018


कोणताही पात्र लाभार्थी
धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट
मुंबई, दि. 11 : रास्तभाव दुकानांमधून धान्य घेणाऱ्या कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केले.
श्री. बापट यांनी सांगितले , कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत. यानुसार, रास्तभाव दुकानातील पॉस PoSमशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार ऑथेंटिकेशन झाले तरी त्या कुटुंबाला धान्य वितरण होणार आहे. आधार ऑथेंटिकेशन नाही झाले तर eKYC करुन घेतल्यास धान्य वितरण होणार आहे. आधार सिडींग नसलेल्या सदस्यांचे eKYC करुन धान्य वितरण होईल. हे तीनही पर्याय शक्य नसल्यास  Route Nominee  च्या आधार ऑथेंटिकेशन च्या आधारे धान्य वितरण करता येणार आहे.
शिधापत्रिकेवरील डेटा पॉस (PoS) मशीनवर उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका,  आधार नोंदणीची प्रत, शासकीय ओळखपत्र/बँकेचे फोटो पासबुक इत्यादी विभागाच्या वेबसाईटवरील घोषित कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्यांकडून प्राप्त करुन घेऊन धान्य वितरण करण्यात येईल. परंतु हा पर्याय एकदाच वापरता येणार आहे.
जिल्हाधिकारी/नियंत्रक  शिधावाटप अधिकारी, मुंबई यांनी  "NO NETWORK  FPS"  घोषित केले असल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत धान्य वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
००००


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...