Wednesday, January 3, 2018

संयम ठेवून कायदा-सुव्यवस्था पाळा
अफवांवर विश्वास ठेवू नका
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता, संयम तसेच कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे बैठक आज संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, भदन्त पय्याबोधी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाचे अधिकारी, समिती सदस्य यांच्यासह या बैठकीस सर्व धर्मीय नागरिक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  
श्री. डोंगरे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील घटनेच्‍या अनुषंगाने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आपण सर्वांनी शांतता आणि संयम पाळावा. सर्वांनी शांततादूत म्हणून काम करावे, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले आहे.   

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...