Wednesday, January 3, 2018

   जनतेने शांतता व संयम ठेवावा
पालकमंत्री खोतकर यांचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- नांदेड जिल्ह्यातील जनतेने शांतता व संयम ठेवून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेवू नये, सामंजस्याचे वातावरण निर्माण करुन सलोखा निर्माण करावा, असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.  
भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरात घडलेल्या हिंसक प्रकारानंतर आजही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यासर्व घटनांचा आपण आढावा घेत असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्कात आहोत. जनतेने कायदा हातात न घेता शांतता व संयम ठेवून सलोखा निर्माण करावा, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...