Thursday, January 4, 2018

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2017
भाग घेण्याचे आवाहन
       
नांदेड, दि. 4 :- राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2017 या कॅलेंडर वर्षा करीता दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 अशी आहे. या स्पर्धेचे माहिती पत्रक, अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in, www.dgipr.maharashtra.gov.in  तसेच www.mahanews.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
            तरी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने  या स्पर्धेत भाग घ्यावा. लातूर विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात संबंधितांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन यशवंत भंडारे, उपसंचालक (माहिती), लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...