Tuesday, October 31, 2017

माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ,
एफएक्यु दर्जा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा
 ---- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन


नांदेड दि. 31 :- नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपला माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला , काडी कचरा विरहीत , स्वच्छ , एफएक्यु दर्जाचा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा , असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मूग-उडिद व सोयाबीन केंद्रे सुरु करण्यासंदर्भात आयोजित बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाचे आधाभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडिद खरेदी करिता देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.
तसेच सोयाबीनकरिता नांदेड , लोहा , देगलूर, धर्माबाद, बिलोली , हदगाव , मुखेड, भोकर व उमरी येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. खरेदी केंद्रावर माल विक्री करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. तसेच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीकरिता सोबत सातबाराचा उतारा 2017-2018 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत (झेरॉक्स) प्रत आणावी.
            या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा मोर्केटिंग अधिकारी श्री. दांड, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नांदेड तालुका उपनिबंधक पी. ए. साठे, कापूस पणन महासंघाचे उपव्यवस्थ्ज्ञापक एस. जी. हनवते तसेच सर्व सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव आदि. विविध विभागाचे विभाग प्रमुखांची या बैठकीस उपस्थिती होती.     

****  

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...