Friday, November 10, 2023

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे

 

पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा

 

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे मोहीमेचा शुभारंभ

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अनुसूचित जमाती असलेल्या 110 जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. यात किनवट तालुक्याचा समावेश आहे.  किनवट येथे 15 नोंव्हेंबर रोजी या यात्रेच्या रथाचे स्वागत व मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभाग प्रमुखांनी त्या-त्या विभागाच्या योजना वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावेअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालसहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तीकेएन एसजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेआत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणेजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आदीची तर सर्व तालुक्याचे मुख्याधिकारीगटविकास अधिकारीतालुका आरोग्य अधिकारीशिक्षण विस्तार अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमेचा पहिला टप्पा 15 ते 23 नोंव्हेंबर या कालावधीत किनवट येथे प्रस्तावित आहे. या कालावधीत ही यात्रा मोहीम 16 ग्रामपंचायतीना भेट देणार आहे. या मोहीमेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमणूकग्रामपंचायतीचा रस्त्याचा नकाशाकार्यक्रमाच्या दिवशी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणेकार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो व व्हीडीओ अपलोड करणे याबाबत माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी किनवट तालुक्याच्या मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितली. तसेच या मोहीमेसाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या गठीत करुन प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीलाभार्थीव्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहीमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे होणार आहे. त्या अनुषंगाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या तात्काळ गठीत कराव्यात. या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहोचायचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाने लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामावर प्राधान्याने भर द्यावाअसे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्पष्ट केले. या मोहीमेत आरोग्यकृषीआवासआयुष्यमान भारतपीएम गरीब कल्याण अन्न योजनापीएम विश्वकर्माजन धन योजनाअटल पेन्शन योजनाबीमा योजनापीएम पोषण अभियानदिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजनास्कॉलरशिप योजनावंदन योजनाउज्वला योजनाउजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभअर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही तसेच फोटोव्हीडीओ संबंधित अधिकाऱ्यांनी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...