Friday, November 25, 2022

 दुर्गम ग्रामीण भागात योजनांच्या

प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्धता आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या धर्माबाद येथे भेट देऊन घेतला आढावा   

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता प्रत्येक तालुक्यातील वाडी, वस्ती, तांड्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यात पायाभूत आवश्यक असलेल्या आरोग्य, शिक्षण, कृषि, सामाजिक न्याय याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. याचबरोबर प्रलंबित भूसंपादन, गुंठेवारी, शासकीय कार्यालय बांधकाम, नागरी सुविधा यांच्या आढाव्यासह खऱ्या गरजू पर्यंत पोहचण्यासाठी तालुका यंत्रणांच्या प्रमुखांनी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या धर्माबाद येथे त्यांनी तहसिल कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तहसिलचे कामकाज व नागरिकांच्या सुविधा याबाबत आढावा घेतला.  

 

सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधाबाबतच्या दस्तऐवजासाठी तहसिल कार्यालयावर जबाबदारी आहे. कोणत्याही योजनेची पात्रता, त्याचे निकष पूर्ततेबाबतची जी काही प्रमाणपत्रे शासकीय यंत्रणांना द्यावी लागतात ती वेळेच्या आत देण्यासमवेत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे शंकासमाधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. धर्माबादचे तहसिलदार दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी निलिमा कांबळे, पोलीस निरीक्षक संजय हिवारे यांच्यासह विविध विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांशी भेटून त्यांनी चर्चा केली.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...