Friday, September 9, 2022

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी

प्रकल्पांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत आहे. त्यानंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प गावातील संबंधित कृषी सहाय्यक किंवा समूह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

कृषी विभाग व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प गावातील लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाला जुळवुन घेण्यास सक्षम करणे. शेती पूरक व्यवसाय किफायतशिर करण्यासाठी जिल्ह्यात ३८४ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.  सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत एकूण प्राप्त अर्जांवर निकषानुसार पूर्व संमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या विषयी संबंधीत शेतकऱ्याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे. 

प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर (http://dbt.mahapocra.gov.in) नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा,  आठ- अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड बाबीसाठी स्वतंत्र अर्ज करावा, असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...