Tuesday, July 26, 2022

 नागरिकांना अतिवृष्टी काळात

प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्ते व पुलावरुन पाणी वाहत आहे. रस्त्यावरुन व पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणाहून वाहतूक करु नये. अशा वेळेस वाहतूक केल्यास व्यक्तीची जिवीतीहानी तसेच त्यांच्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे नागरिकांनी खबरदारी घेवून प्रवास करावा व अनावश्यक रस्ते अपघात टाळावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी  केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...