Thursday, July 21, 2022

 नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 21 जुलै रोजी 70 टक्के क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग 346 क्यमेक्स (12218 क्युसेस) विसर्ग सकाळी 10 वाजता नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवीताचे, पशुधनाचे, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जनचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...