Friday, April 1, 2022

 खाजगी वाटाघाटीने आणखी

38 गावांना हक्काची स्मशानभूमी

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- गाव तेथे स्मशानभूमी ही प्रत्येक गावकऱ्यांच्या संवेदनेचा गाभा असलेली विशेष मोहिम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सुमारे 300 खेड्यांपेकी 200  गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. यातील 174 गावांचे आदेशही निर्गमीत करण्यात आले. उर्वरीत गावासंदर्भात युद्धपातळीवर प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून जिल्ह्यातील आणखी 38 गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात 2 गावे, कंधार तालुक्यात 3, भोकर 5, देगलूर 4, धर्माबाद तालुक्यात 4, हदगाव तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 9 गावे आहेत. स्मशानभूमी संदर्भात शासन निर्णयानुसार संबंधित गावांच्या भूधारकांची जमीन खाजगी वाटाघाटीतून उपलब्ध करून देण्यात आली.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...