Friday, October 8, 2021

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांची

कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडून पाहणी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अतिवृ्ष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव इतर अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथ डवले म्हणाले की, कृषी विभागाने 3.5 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात करडई लागवड करावी तसेच खरीप हंगामासाठी उन्हाळी सोयाबीन कार्यक्रम राबवून सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे यामुळे 15 ऑक्टोबर पर्यत सोयाबीन पिकाची काढणी करावी व सोयाबीन सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे अशा सूचना त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केल्या.

000000  





No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...