Thursday, August 19, 2021

सुधारित वृत्त

 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- शेती व शेतपूरक उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मूल्यवर्धी साध्य करता येईल. गटशेतीद्वारे शेतकऱ्यांनी मिळून पुढाकार घेतल्यास त्यातून सर्वांचे हित साध्य करता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. देगलूर तालुक्यातील विविध उपक्रमांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेटी दिल्या, त्यावेळी ते बोलत होते. 

या भेटीत त्यांनी काठेवाठी येथील मिनी दाळमिल प्रकल्प, गीर गाय प्रकल्प, बायोगॅस युनिट, बांबू लागवड, पेरू, सोयाबिन मुग कापुस पिके, मौजे होट्टल येथील पेरू फळपिक व पावर टिलर, कांदा पैरणी यंत्र, देगलूर येथील लाकडी घाणा तेल युनिट व बन्नाळी येथील चेरी प्रक्रीया युनिट आदी उपक्रमांची पाहणी केली. यावेळी करडई पिकामध्ये राज्य स्तरावर बक्षिस मिळालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

शेतकऱ्यांना शेतपूरक उद्योगात जसे पेरू पासून जाम जेली, कडधान्यापासून डाळी, करडई भूईमुगा पासून तेल, दुधापासून तूप, श्रीखंड, दही असे दुग्धजन्य पदार्थ असे विविध प्रक्रिया उद्योग उभारून चांगल्या प्रकारे ते विक्री करता येऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.   

यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषि अधिकारी एम के सोनटक्के, तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, गटविकास अधिकारी मुक्कावार, तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, मंडळ कृषि अधिकारी गिरी, सोनकांबळे, कृषि अधिकारी इढोळे, मंडळ अधिकारी इज्जपवार, कृषि पर्यवेक्षक सुरेश कावाटवाड, शेतकरी सुर्यकांत पोतुलवार, साहेबराव बोने, नारायण पाटील, बसवंत बिरादार, सायलू सुर्यवंशी, आदित्य एकलारे, राजू शिवणे पाटील, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व शेतकरी आदींची उपस्थिती होती.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...