Friday, June 4, 2021

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त वृक्ष लागवड मोहिमेसाठी

नागरिकांनी पुढे सरसावे   

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड, दि. 4 (जिमाका) :- बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास रोखायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनाच शुद्ध हवेचे, प्राणवायुचे महत्व पटले असून निसर्गातून ज्या झाडातून आपल्याला प्राणवायु मिळतो त्याच्या लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे सरसावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहिम विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हाती घेण्यात आलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रत्येक व्यक्ती मागे किमान तीन झाडे लावण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार ही वृक्षलागवड मोहिम लोकचळवळीत रुपांतर करुन अधिकाधिक यशस्वी करण्याचे नियोजन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले गेले आहे.

 

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 33.60 लक्ष असून प्रत्येक व्यक्ती मागे 3 वृक्ष गृहित धरुन एकुण उद्दीष्ट हे 100.80 लक्ष वृक्ष लागवडीचे निर्धारित केले आहे. वृक्षलागवडीच्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय अशा सर्व घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यात मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व शहरातील उत्सफुर्त सहभाग नोंदवून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...