Tuesday, January 12, 2021

 जिल्ह्यात आगी घटना टाळण्यासाठी

कार्यालय प्रमुखभोगवाटाधारकांनी दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शासकिय कार्यालयमोठ्या इमारती व इतर सार्वजनिक ठिकाणी आगी सारख्या घडणाऱ्या घटना विशेष काळजी घेतील तर निश्चित टाळण्यासारख्या असतात. अशा घटना टाळण्यासाठी त्या-त्या कार्यालय प्रमुखांनीइमारतीच्या मालकांनी अथवा भोगवाटादार यांनी वेळीच अग्नीशम प्रतिबंधक उपाय योजनेंतर्गत असलेल्या निर्देशाचे पालन करुन दरवर्षी नित्यनियमाने ॲडिट करुन घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात 6 डिसेंबर 2008 पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधात्मक आणि जीवसंरक्षक उपाय योजना अधिनियम2006 याची अंमलबजावणी निश्चित केली आहे. या अधिनियमानुसार दिलेल्या निर्देशाचे सर्व कार्यालय प्रमुख व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या इमारतीसार्वजनिक उपक्रम ज्या ठिकाणी होतात त्या इमारतींच्या मालकांनीभोगवाटाधारकांनी पालन करुन कोणत्याही अपघाताबाबत त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज केले.

 

अग्निशमन सुरक्षा आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006  बाबत आज बचत भवन येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाकारी प्रदिप कुलकर्णीउपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरीजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेमनपाचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रईश पाशा व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील विद्युत उपकरणांची सुरक्षितता व महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीवरक्षक उपाय योजना अधिनियम 2006 व नियम 2009 अंतर्गत दिलेल्या निर्देशाचे पालन व उपाय योजना करुन घेतल्या पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा इमारत बांधून संबंधित विभागांना ती इमारत हस्तांतरीत केल्यास त्याच्या संपूर्ण देखभालदुरुस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाची असते हे लक्षात घ्या असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रईश पाशा यांनी अधिनियमातील तरतुदीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

00000



No comments:

Post a Comment

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   ·           बाल विवाह होणार न...