Saturday, January 23, 2021

 

पूर्णा प्रकल्पावर 2 वर्षापासून कालवा स्वच्छता अभियान राबविणाऱ्या

मानवलोक संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला गौरव 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  कालव्यांची डागडुजी हा शासनस्तरावर दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला  आहे. हा प्रश्न सामाजिक बांधिलकी व सेवाभावातून सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कालवा स्वच्छता अभियानाद्वारे सोडविणाऱ्या मानवलोक सेवाभावी संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गौरव केला. जलसंपदा विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवलोक संस्थेने त्यांच्याकडील सात जेसीबी व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री सेवाभावातून कामासाठी उपलब्ध करुन दिली. केवळ कालवे दुरुस्त नाहीत म्हणून शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नयेत ही भूमिका मानवलोकने जपून या कामात पुढाकार घेतल्याचे या संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले.  

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...