Friday, September 18, 2020

 

   पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्यात यावे

-         कृषि पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब रावणगांवकर 

नांदेड, दि. {जिमाका} 18 :-  शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे काढणीच्यावेळी योग्य प्रकारे हाताळणी साठवण करुन पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्याचे आवाहन कृषि पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब किशनराव रावणगांवकर केले आहे.

जिल्हयात सर्वाधिक सोयाबीन पिक पेरणीक्षेत्र असून सोयाबीन पिकाखाली 3 लाख 81 हजार 518 हे. क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळी अवेळी पावसामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील उच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे स्थानिक पातळीवर जतन करुन पुढील खरीप हंगामासाठी त्याचा वापर करावा असे  कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...