Monday, June 8, 2020

वृत्त क्र. 519



उगवण क्षमतेची खात्री करुन
शेतकऱ्यांनी बियांणाची निवड करावी  
-         कृषि सभापती बाळासाहेब रावणगावकर 
नांदेड (जिमाका) दि. 8 :- शेतकऱ्यांनी उपलब्ध सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी योग्य पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर  यांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी  सर्व बियाणे, रासायनिक खते, औषधी अधिकृत कृषि सेवा केंद्रधारकाकडूनच शेतकऱ्यांनी घ्यावीत. तसेच बियाण्याची अंतिम मुदत बघुन घ्यावी असेही त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगून खालील खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे.
सोयाबीन आणि कापूस बियाण्याच्या कुठल्याही एकाच कंपनीच्या वाणाची मागणी शेतकऱ्यांनी जास्त करु नये. कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून बियाणे, रासायनिक खते औषधी खरेदी करणे शक्यतो टाळले पाहिजे. नांदेड जिल्हयात खरीप हंगाम सुरु असून 8 लाख 2 हजार 190 हेक्टर क्षेत्र सर्व खरीप पिकांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यात मुख्य सोयाबीन पिकाकरीता 3 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासाठी शासन स्तरावरुन सुचित केलेल्या बियाणे दरानुसार 1 लाख 5 हजार  क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीपेक्षा जास्त 1 लाख 20 हजार  क्विंटल सोयाबीन पुरवठा झालेल्या तसेच कापूस पिकाकरीता जिल्हयाचे 2 लाख 3 हजार  हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्या करीता 9 लाख 65 हजार पॉकीटची मागणी करण्यात आली आहे. जिल्हयात कापूस पिकाचे बियाणे सुध्दा मागणी पेक्षा जास्त 10 लाख 50 हजार  पॉकीटे उपलब्ध झाले आहे.
खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन किंवा पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. जिल्हयात बियाणे, रासायनिक खते औषधी यांच्या विषयी काही तक्रार असल्यास तालुकास्तरावर कृषि विभाग पंचायत समिती कृषि विभाग यांचेकडे तसेच जिल्हा स्तरावर कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.
                                                       0000                                                          

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...