Friday, June 5, 2020

वृत्त क्र. 518


जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर
आजपर्यत 126 बाधितांनी केली कोरोनावर मात
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोना बाधिताच्या संख्येत आज 7 बाधित व्यक्तींची भर झाली असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 7 बाधितामध्ये माहूर तालुक्यातील पलाईगुडा गावातील 33 वर्षे वयाचा एक पुरुष, तर नांदेड येथील नईआबादी शिवाजीनगर  व खय्युम फ्लॅाट परिसरातील 6 बाधित व्यक्ती आहेत. त्यापैकी 3 पुरुष अनुक्रमे वय वर्षे 26, 50, 50 आणि 3 स्त्री अनुक्रमे वय वर्षे 13, 23, 42 आहे. आतापर्यंत बरे झालेली व्यक्तींची संख्या 126 आहे.  
नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या आता 189 झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवार 5 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 48 अहवालापैकी 37 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. सद्यस्थितीत रुग्णालयात 55 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 बाधिताची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52  65 वर्षांच्या दोन स्त्री बाधित तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 189 बाधितापैकी 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 126 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 55 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 बाधित , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 42 बाधित, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 बाधित तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर एका बाधितांवर  उपचार सुरु आहेत.  
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 349, घेतलेले स्वॅब 4 हजार 316, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 825, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 7, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 189, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 171, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 55, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 126, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 55, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 71 एवढी आहे.
दिनांक 4 जून रोजी प्रलंबित असलेल्या 73 स्वॅब तपासणी अहवालापैकी 48 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 25 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 5 जून रोजी 46 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...