Monday, February 24, 2020


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती, 2019 योजनेंतर्गत
सोनखेड आणि कामठा बु. येथे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

नांदेड, दि. 24:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड   अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.    
   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील लोहा अर्धापूर तालुक्यातील सोनखेड कामठा बु. येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या प्रक्रियेची आज सुरुवात करण्यात आली.
ग्रामपंचायत कामठा बु. येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्री. प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड, श्री. सुजीत नरहरे तहसीलदार, अर्धापूर, श्री. अमरसिंह चौहान, सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. अर्धापूर, तलाठी, ग्रामसेवक, ज्येष्ठ तपासणीस, जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा अर्धापूर, ग्रामपंचायत सदस्य, गटसचिव शेतकरी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात लोहा अर्धापूर तालुक्यातील सोनखेड कामठा बु. येथील आधार प्रमाणीकरण   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या पथदर्शी योजनेचे हाती घेतले असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला.
 सोनखेड येथील 261 कामठा बु. येथील 162 पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. सदरच्या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची शहानिशा करून त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.    
यावेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तहसीलदार, अर्धापूर यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही करण्यात आले.
जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 632 शेतकऱ्यांपैकी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दि. २८ फेब्रुवारी, २०२० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. असे  सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी सांगितले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 632 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित 1461.36 कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील.
तसेच दि. 24 फेब्रुवारी, 2020 पर्यत 1 लाख 95 हजार 661 शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे पोर्टलवर अपलोड केली असून उर्वरीत शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 1545 आपले सरकार केंद्र जिल्ह्यातील सर्व बँक स्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र / सामुहिक सुविधा केंद्र / बँकेचे शाखेत जात असताना स्वत:चे आधार कार्ड, यादीमधील विशिष्ट क्रमांक, बचत खाते पुस्तक मोबाईल सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र / सामुहिक सुविधा केंद्र /बँकेचे शाखेकडून आधार प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था प्रवीण फडणीस यांनी सांगितले.
00000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...