Friday, December 6, 2019


बंद पडलेल्या पीएलआय,
आरपीएलआय पॉलिसींचे पुनरुज्जीवन
 नांदेड दि. 6 :- बंद पडलेल्या पीएलआय, आरपीएलआय पॉलिसी प्रीमियमच्या तारखेपासून 5 वर्षाची मर्यादा ओलांडलेल्या पॉलिसींना 31 डिसेंबर 2019 पर्यंत पुनरुज्जीवनासाठी एक विशेष योजना राबविली जात आहे, असे आवाहन अधीक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.
या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करतांना विमाधारकाचे आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे  आवश्यक आहे. अशा पॉलिसीचे पॉलिसीधारक ज्यांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉसिली पुनरुज्जीवित करण्याचा विचार आहे त्यांनी जवळच्या कोणत्याही पोष्ट कार्यालयामध्ये लेखी अर्ज करावा. मंगळवार 31 डिसेंबर 2019 नंतर अशा प्रकारच्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन केले जाणार नाही.
पोष्ट कार्यालय लाईफ विमा नियम 2011 च्या अटी व शर्तीमध्ये केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने अधिसूचना 19 सप्टेंबर 2019 नुसार टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) धारकांना आवाहन करण्यात आले आहे की,  ज्या पॉलिसीधारकांच्या पॉलिसी बंद, खंडीत झालेल्या असतील तसेच सतत 5 वर्षे भरणा न केल्याने बंद पडल्या असतील त्याचे पुनरुज्जीवन 1 जानेवारी 2020 नंतर करता येणार नाही, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...