Monday, November 18, 2019


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
              नांदेड दि. 18 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड येथे स्वत: शनिवार  30 नोंव्हेबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
        सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार  थेट वितरीत करण्यात येते.
लाभाचे स्वरुप या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौध्द या प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षाजास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेदिव्यांग (अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा.
विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक  असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. अर्जाचा नमुना http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in हे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 
अर्ज करण्यासाठी जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा,आधारकार्डची प्रत, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र/फॉर्म नं.16, विद्यार्थी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता 11 वी 12 वी पदवीचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधारक्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्यानी कोणत्याही शासकिय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील.
विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवुन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण केल्यास अथवा नौकरी व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवुन गैरवापर केल्याचे निदर्शनास अल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल.  
अपुर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्र सादर केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असेही आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment