Sunday, September 8, 2019

विशेष वृत्त


गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात
60 लाख व्यक्तींना रोजगार

मुंबई, दि. 8 : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे. देशातीलएकूण रोजगारांपैकी 25 टक्के रोजगार निर्मिती राज्यात झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
मराठवाडा विभागात 1 लाख 8 हजार 674 सुक्ष्म व लघु उद्योग स्थापन झाले. ज्यात, 17 हजार 663 कोटी रुपये गुंतवणूक व 5 लाख 80 हजार 507 रोजगार निर्मिती झाली. विदर्भ विभागात 1 लाख 94 हजार 420उद्योग स्थापन उभे झाले असून 18 हजार 236 कोटी रुपये गुंतवणूक आणि 6 लाख 37 हजार 409 रोजगार निर्मिती झाली आहे.
मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र या दोन महत्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे  रोजगार निर्मितीला चालना मिळाली असून सामंजस्य करारापैकी कार्यान्वीत झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
युवा उद्योजकांसाठी स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारामुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वंकष अशाया योजनेत  उद्योजकांवर पडणारा व्याजाचा भार कमी करण्यात आला आहे.
 बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे 50 हजार युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
नव उद्यमींना सूक्ष्म व लघु उद्योग सुरु करण्यास सहाय्य व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारे व व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. असे उद्योग विकास आयुक्त तथा विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.
०००००

No comments:

Post a Comment