Friday, July 26, 2019


आदर्श ग्राम निर्मितीची संकल्पना ही
एक लोकचळवळ झाली पाहिजे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावाच्या सर्वोत्तम विकासाबरोबर  नागरिकांशी संवाद साधून आदर्श ग्राम निर्मितीची संकल्पना ही एक लोकचळवळ उभी राहिली पाहिजे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीचा विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली यांनी गुरुवार 25 जुलै रोजी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषेदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोळगणे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, माविमचे चंदनसिंग राठोड, अभियानाचे व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, सहा अभियान व्यवस्थापक प्रतिक आचरे, जिल्हा व्यवस्थापक दिनेश मराठे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपरिवर्तक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानात समाविष्ट जिल्ह्यातील गावातील विकास कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे. गावातील मुलभुत सुविधांबरोबर आवश्यक विकास कामांना यात प्राधान्य राहिले पाहिजे. नागरिकांशी संवाद हा महत्वाचा असून आदर्श गावासाठी स्थानिक नागरिकांची महत्वाची भुमिका आहे. त्यांच्यातील उत्तम कलागुणांची माध्यमातून गावात चांगले परिवर्तन करण्यास मदत होईल. नागरिकांना विविध विभागाच्या योजनेची माहिती देऊन त्यांना त्याचा लाभ दयावा. त्यांची नैराश्यातून आत्महत्या होणार नाही यासाठी ग्रामस्तरावर प्रबोधनात्मक उपक्रम राबविली पाहिजे. यासोबतच गाव धूरमुक्त, हागणदारी मुक्त, घरकुल, पाण्यासाठी स्वयंपूर्ण असेल यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाची आहेत, असे निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले.
 यावेळी जिल्ह्यातील या अभियानांतर्गत समाविष्ट गावांत होत असलेल्या विविध योजनांचा प्रगतीचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या. आदर्श ग्राम निर्माणासाठी ग्रामपरिवर्तकासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध होऊन सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक अभियानाचे व्यवस्थापक दिलीप बयास यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक दिनेश मराठे यांनी मानले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आंदबोरी (ई), आंबाडी तांडा, गौरी, धामनधरी, दिगडी (मं), कनकवाडी, प्रधानसांगवी व वझरा बु. या आठ गावांच्या आणि लोहा तालुक्यांतर्गत वाळकेवाडी, टेळकी, हंगरगा व फुटकळवाडी या पाच गावांचा, कंधार तालुक्यातील हनमंतवाडी, रामनाईक तांडा, मोहिजा व हटक्याळ आणि हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा बु. पारवा बु. व टेंभी या तीन गावांचा याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील 26 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी 18 गावांमध्ये सध्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या ग्रामपरिवर्तंकांचे ग्रामपंचायतीअंतर्गत सादर केलेला 42 कोटी 1 लाख 46 हजार 845 रक्कमेच्या गाव विकास आराखडयांना मंजुरी देण्यात आली. या अभियांनातर्गत आदर्श ग्रामस्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतीचे मुल्यमापन करण्यासाठी 12 सदस्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. तसेच 2017-18 2018-19 मध्ये विविध शासकीय विभागांमार्फत प्रलंबित कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेवुन पुर्तता करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...