Thursday, June 27, 2019

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2019-20 शेतकऱ्यांना 24 जूलै पर्यंत विमा प्रस्ताव भरण्याचे आवाहन



नांदेड दि. 27 :-  प्रधनमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019-20 हंगामात राबविण्या बाबत / बिगरकर्जदार शेतकऱ्यांना लागू राहणार आहे.भात, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुग, तुर, भुईमुग, कारळ, तीळ, सोयाबीन,सुर्यफुल व कापूस या पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम मुदत 24 जुलै,2019 आहे. तरी विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरील योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहिती साठी संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  उपविभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक / राष्ट्रीयकृत बँक अथवा ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...