Friday, April 26, 2019


विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तिरावरील
एक्सप्रेस फिडर बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नांदेड, दि. 26 :- विष्णूपुरी जलाशयातील 30 दलघमी पाणी नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी पिण्याकरीता आरक्षीत ठेवण्यात आला आहे. शहरात पाण्याची बिकट परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायद्यातील तरतुदी नुसार वीज पुरवठा खंडीत करता येऊ शकतो. त्यासाठी विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तिरावरील तात्काळ एक्सप्रेस फिडर बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी नांदेड यांना निर्देश दिले आहे.
सन 2018-19 साठी पाणी आरक्षण समितीच्या बैठक घेण्यात आली. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून जलाशयातील पाणीसाठा पुर्णपणे सुरक्षीत करण्याची गरज आहे. जलाशयातील अनाधिकृत बागायतदाराकडून उचलला जाणारा पाणीसाठी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने व आवश्यक सनियंत्रण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी चार, तहसीलदार लोहा, पालम व पुर्णा यांनी प्रत्येकी एक असे एकूण सात पथकांची निर्मिती केली. या पथकामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या प्रतिनिधींची भुमिका महत्वाची आहे.
            विष्णुपूरी जलयाशयातील दोन्ही तिरावर शेतकऱ्यांनी बसविलेल्या पंपाची अश्वशक्ती अंदाजे 12 हजार एवढी असून या पंपाचा विज पुरवठा तात्काळ खंडीत केला तरच उपशावर प्रभावी नियंत्रण मिळविता येणार आहे. विष्णुपूरी प्रकल्पात 25 एप्रिल 2019 रोजी 8.57 दलघमी पाणीसाठा असून दररोजचा उपसा 0.57 दलघमी एवढा आहे. याप्रमाणे उपसा चालू राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा 30 मे 2019 पर्यंत संपेल ही बाब लक्षात घेऊन नांदेड शहरात पाण्याची बिकट परिस्थिती उदभवणार नाही यासाठी  कायद्यातील तरतुदीच्या आधीन राहून वीज पुरवठा खंडीत करता येतो, असेही निर्देश दिले आहे.   
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...