Monday, April 29, 2019


उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे
बिगरसिंचन पाणी वापराबाबत आवाहन
नांदेड, दि. 29 :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण)  सन 2018-19 साठी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी टंचाई कालावधीसाठी नांदेड जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी 35 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दरवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाकडून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार बिगर सिंचन पाणी सोडण्यात येते.
आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाकडून पूर्णपणे भरणा केली जात नाही. जुन 2018 अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे 55 कोटी 82 लाख रुपये तसेच सन 2018-19 साठी आरक्षित पाण्याची 50 टक्के अग्रीम पाणीपट्टी  63 लाख रुपये अशी एकूण 56 कोटी 45 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी 16 लाख रुपये इतका भरणा करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्र. संकीर्ण-1002 / (208/02) / सिं.व्य.(धो) दिनांक 10 डिसेंबर 2003 अन्वये आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र 1 नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...