Wednesday, January 23, 2019


इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रवेशासाठी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2019-20 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देणेसाठी इच्छूक पालकाकडून गुरुवार 30 जानेवारी 2019 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट येथून प्राप्त करुन कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन अभिनव गोयल (भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमतीपत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला जोडावा. अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह असावा. विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, / तालुका व जिल्हा चिकत्सक यांचे  यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीता, निराधार, परितक्त्या व दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. घटस्फोटीता कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत लेखी लिहुन दयावे. वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे तसेच इयत्ता पहिली व दुसरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा कालावधी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 पर्यंत राहिल. अर्जात खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...