Friday, December 21, 2018


अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यावर

फौजदारी तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार    

 

नांदेड, दि. 21:-  उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) उजव्या व डाव्या कालव्यावर व त्यावरील शाखा कालवे, वितरीका, उपवितरीकांवर अनधिकृतपणे विनापरवानगी पंपाद्वारे उपसा करणाऱ्या तसेच कालव्यावरील बांधकामांना क्षती पोहचवून नदी, नाल्याद्वारे पाणी घेवून अथवा कालवा भरावास क्षती पोहचवून कालवा भरावून विहीरी , शेततळे अनधिकृतपणे , विनापरवानगी भरुन घेण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अशा सर्व उपसा करणाऱ्या व्यक्ती, संस्था, शेतकरी यांना कळविण्यात येते की, सदरील कृती ही महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार बेकायदेशीर असून अशा सर्व घटना या फौजदारी प्रक्रियेस पात्र आहेत. वरील अनधिकृत पाणी उपस्यामुळे शेवटच्या भागातील लाभधारक सिंचनाच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

त्यामुळे अशा सर्व अनधिकृत उपसा करणाऱ्या / अथवा पाणी घेणाऱ्या व्यक्ती , संस्था, शेतकरी यांना कळविण्यात येते की, अशी बेकायदेशीर कृती केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, शेतकरी, यांच्या विरोधात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 अन्वये फौजदारी तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता वि. कि. कुरुंदकर यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...