Tuesday, October 23, 2018


विष्णुपूरी प्रकल्प जलाशय काठावरील बागायतदारांना
दोन पाळ्यासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन
                    नांदेड, दि. 23 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे. अधिकृत परवानाधारक बागायतदारांननमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने केले आहे.
               शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील सन 2018-19 यावर्षी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे दृष्टीकोनातुन 16 ऑक्टोंबर 2018 रोजी  मंत्री जलसंपदा यांचे अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या प्रकल्पात 16 सप्टेंबर 2018 रोजी शंभर टक्के पाणीसाठा होता. दिनांक 20 ऑक्टोंबर 2018 रोजी विष्णुपूरी जलाशयात 79.94 टक्के एवढा पाणीसाठा आहे. याप्रमाणे जलाशयातील पाण्याचा वापर झाल्यास विष्णुपूरी प्रकल्पातील पाणीसाठा फेब्रुवारी 2019 अखेर पुर्णपणे संपेल त्यामुळे नांदेड शहर व परिसरातील ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
               कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात फ़क्त अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे.  पाणी उचलण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. प्रथम पाणीपाळी 1 ते 15 नोव्हेंबर 2018 तर द्वितीय पाणीपाळी  1 ते 15 डिसेंबर 2018 हा आहे.  केवळ या पाणीपाळी कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन विज पुरवठा चालु ठेवण्यात येणार आहे.                दिनांक 16 ते 30 नोव्हेंबर 2018 व दिनांक 16 डिसेंबर 2018 पासुन पावसाळा 2019 मध्ये जलाशयात समाधानकारक  पाणीसाठा येईपर्यंत विद्युत पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे.
               जिल्हाधिकारी नांदेड यांचे 15 ऑक्टोंबर 2018 च्या आदेशानुसार अनाधिकृत उपसा पुर्णपणे बंद करण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्युत मोटारी / डिझेल पंप जप्तीची कार्यवाही करण्यात येईल तेंव्हा अधिकृत परवानाधारक बागायतदारांननमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास खालील दर्शविलेल्या शर्तीचे अधीन राहुन प्रचलीत शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल.
               पाणी अर्जाचा विहीत नमुना क्रं. 7 () संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य  मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी विस आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पुर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरते वेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालू  पिकाची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे.  म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल. मंजुर क्षेत्रास जलाशयाचे पाणी अग्रक्रमाणे घेता येईल नामंजुर व अनाधिकृत क्षेत्रास पाणी घेता येणार नाही. तेंव्हा मंजुरी घेऊन पिकांचे  नियोजन करावे. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाणे  टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक रहातील.
               नामंजुर क्षेत्रावरील उभ्या हंगामी / बारमाही पिकाचे पाण्याअभावी नुकसान झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची सर्व बागायतदारांनी नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार पाणी टंचाईची भिषण परिस्थिती विचारात घेऊन प्रकल्पातील पिण्यासाठीचा पाणीसाठा राखीव ठेवण्यास प्रत्येक बागायतदाराने सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता मु. मो. कहाळेकर यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...