Thursday, October 11, 2018


सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
लांडगेवाडी येथे केली पिकांची पाहणी  
       
नांदेड दि. 11 :-  मुग, उडीद व सोयाबीन कमी किमंतीत विक्री न करता हमीभाव केंद्रावर माल न्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे  मरिबा मस्के आणि किशन वलोटे यांच्या शेतात पिकाची पाहणी केली. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्यावेळी शेतकऱ्यांना व सरपंचाना उपस्थित राहण्याचे सांगितले. पाणीटंचाईबाबत चौकशी केली. त्याबाबत नियोजन व आराखडा तयार करावा. पीक आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्याबाबत व त्याप्रकारे अहवाल पाठविण्यास सांगितले. शेतमाल तारण योजना बाजार समितीने राबवावी व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भाने उपस्थित जवळपास 125 शेतकऱ्यांशी श्री. देशमुख यांनी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सोयाबीन पिकाचे वाढीपुर्वीच वाळून गेलेली परिस्थितीची पाहणी त्यांनी केली.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा कृषी अधिकारी विश्वांभर मंगनाळे, सहाय्यक निबंधक जी. आर. कौरवार, बाजार समितीचे सचिव आनंद घोरबांड , सरपंच श्रीमती कलावती रामचंद्र बलोरे, शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती.
****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...