Monday, August 20, 2018


सण उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढवावा
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 20 :-  बकरी ईद (ईद-उल-झुआ) सण शांततेत, उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढीस लागेल यापद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. बकरी ईद (ईद-उल-झुआ), रक्षाबंधन , नारळी पोर्णिमेच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी महापौर शिलाताई भवरे, मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, इदगाहच्या ठिकाणी साफसफाई, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. बकरी ईद सण कालावधीत शांतता अबाधीत रहावी म्हणून जिल्ह्यातील  यंत्रणांनी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या.  
पोलीस अधीक्षक श्री जाधव म्हणाले, जिल्ह्यात हा उत्सव शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असते. तसेच सर्वांनी कायद्याचे पालन करावे. कुठल्याही सोशल मिडियावरील अफवावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाकडे माहिती तात्काळ कळवावी. त्यासंबंधीत माहितीची खात्री करुन घ्यावी.  
उपस्थित शांतता समितीतील सदस्यांनी विविध उपयुक्त अशा सुचना मांडल्या. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले  तर आभार अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी मानले.
00000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...