Tuesday, August 14, 2018


नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्पात
जिल्ह्यातील 384 गावांची निवड
नांदेड, दि. 14 :- नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्पातर्गत नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात 384 गावांची निवड करण्यात आली असून प्रथम टप्यात अर्धापूर, किनवट, मुदखेड, देगलूर, कंधार, भोकर, उमरी, नायगाव या 8 तालुक्यातील 70 गावांची निवड करण्यात आली आहे.
प्रथम टप्यात 64 ग्रामपंचायतींचा समावेश असून 56 गावात  44  ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या योजनेतर्गत प्रत्येक गावात सोयाबेन + तूर आणि कापूस + उडीत / मूग हे प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येऊन प्रात्याक्षिकांस लागणारे बियाणे, MAUS -१५८, BDN - ७१६, NH - ६१५ या वानाचे वितरण करण्यात आले आहे. या 70 गावांमध्ये एकूण 140  शेतीशाळचे आयोजन करण्यात येऊन, शेतीशाळमार्फत पेरणी पूर्व पेरणी पश्चात शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत. या योजनेतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बळकटीकरण सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे.
निवड करण्यात आलेल्या 70 गावांची सुक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून हवामान अनुकूल शेती पद्धती अवलंब करून सर्व समावेशक बाबी अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्या अनुषगांने मुदखेड तालुक्यातील ( इजळी / चिकाळा / रोहिपिंपळ्गाव / वाडी मुक्तायची / वाडी मुक्तापूर ) या 5 गावांची सुक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...