Saturday, July 7, 2018


भारतीय डाक विभागाच्यावतीने
"प्रिय मेरे देश के नाम खत" या विषयावर
राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा
नांदेड, दि. 7 :-  भारतीय डाक विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर पत्र लेख स्पर्धा "ढाई आखर"  आयोजीत केली आहे. पत्राचा विषय "प्रिय मेरे देश के नाम खत" हा असून पत्र कोणत्याही भाषेत लिहिता येईल. पत्र मुख्य पोस्ट मास्तर जनरल मुंबई यांच्या नावे लिहून डाक घरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटीत सोमवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत टाकावयाचे आहे. 
पत्र लेखन स्पर्धा 18 वर्षापर्यंत एक गट व 18 वर्षावरील दुसरा गटात विभागलेली आहे. स्पर्धकांनी 1 जानेवारी 2018 रोजी स्वत:चे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा जास्त आहे याबाबत उल्लेख करावा. तसेच नाव पत्त्यासोबत वयाचा उल्लेख आवश्यक आहे. पाकिटातून पत्र पाठविण्यासाठी 1 हजार शब्द मर्यादा तर अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्द मर्यादा राहील. मुदतीनंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेत समावेश होणार नाही.
राज्यस्तर उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 10 हजार रुपये व 5 हजार रुपये पारितोषीक राहील. राज्यस्तरातून प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राचा राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, 10 हजार रुपये पारितोषीत देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड विभागाचे अधीक्षक डाकघर एस. बी. लिंगायत यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...