Monday, July 2, 2018


मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका ;
नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना अवगत करावे
जिल्हादंडाधिकारी यांचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश
नांदेड, दि. 2 :- मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांबाबत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आपल्या परीक्षेत्रात अधिनस्त असणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी ( मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पोलीस पोटील, शिक्षक) यांना आपल्या स्तरावरुन नागरिकांना या अफवांवर विश्वास ठेऊ नका व कर्तव्याच्या ठिकाणी अशी घटना घडत असेल तर कायदा हातात न घेता याबाबत पोलीस विभागाला अवगत करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा सोशल मिडिया ( व्हॉटस् अप, भ्रमणध्वनी आदी ) वरुन मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्याचे संदेश फिरत असून या अफवांमुळे गैरसमज होऊन नागरिकांकडून संशयीत दिसणाऱ्या उपजिविकेसाठी भटकणाऱ्या व्यक्ती तसेच समुह यांना मुले पळविणारे असल्याचे समजून विनाकारण मारहाण केल्या जात आहे. परिणामी मारहाणीत काही घटनांमध्ये संबंधिताचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, असेही जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केलेल्या पत्रात नमूद केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...