Monday, June 25, 2018


आराखड्यानुसार जलयुक्तची

कामे वेळेत पूर्ण करावीत  

 --- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड, दि. 25 :- जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मनरेगाची कामे आराखड्यानुसार कामे वेळेत व नियोजनबद्ध पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज दिले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीस उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे उपजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक नरेगा श्रीमती कल्‍पना क्षिरसागर, सामाजिक वनविभागाचे विभागीय वन अधिकारी सुर्यकांत मंकावार, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे तसेच जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपविभागीय अभियंता तसेच विविध विभागांच्‍या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे म्‍हणाले की, सन 2017-2018 मधील जिल्ह्यात 183 गावांची निवड करण्यात आलेली आहेत. एकूण 5 हजार 424 कामे प्रस्तावित आहेत. 4 हजार 85 कामे पूर्ण तर 343 कामे प्रगतीपथावर आहे. रुपये 27.76 कोटी खर्च झाला आहे. जून, 2018 अखेरपर्यंन्त सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गतची 82 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. 40 टक्के गावे जलपरिपुर्ण झाली आहेत.

सन 2018-2019 मध्ये 216 गावांची निवड करण्यात आली आहे. शिवार फेरी पूर्ण झालेली आहे. आराखड्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक गावातील पाच व्यक्तींचे प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आलेले आहेत. आराखड्यास जिल्हास्तरीय मान्यताही दिली आहे. सन 2018-2019 मधील कामांबाबत तालूका कृषि अधिकारी, किनवट व जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी रोहयो महेश वडदकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...