Monday, June 11, 2018


शासनाच्या विविध योजनेचा लाभ
वंचितांपर्यंत पोहचवावा
- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे  
नांदेड, दि. 11 :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व विभागांनी वंचितापर्यंन्त पोहचवाव्यात. ग्राहक हा राजा समजून त्यांची फसवणूक होवू नये यासाठी सर्व स्तरातून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रिय व्हावे, असे निर्देश राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे यांनी दिले .  
नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, समिती सदस्य संजय भोसरीकर , संजय जोशी , तहसीलदार किरण अंबेकर तसेच समिती सदस्य, जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह समिती सदस्य, प्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे म्हणाले की, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यावर कार्य होत आहे. ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा सत्वर देण्याचा प्रयत्न करीत आहे. वस्तू खरेदी करताना तीची किंमत, वजन आणि प्रमाणाबाबत माहिती घेवून ग्राहकांनी जागरुक राहून खरेदी करावी . ग्राहकांनी खरेदी करतेवेळी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेवून खरेदी करावी. सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात समन्वय असणे फार महत्वाचे असते. 
तसेच ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने 1986 चा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्यातंर्गत ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न विभाग करीत आहेत. ग्राहकांच्या काही तक्रारी असतील, तर त्या जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा त्या विभागाच्या विभाग प्रमुख यांच्याकडे लेखी सादर कराव्यात . त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ग्राहकांच्या सुविधासाठी टोल फ्री क्रमांक 1800-222-365 असा आहे. या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकता. ही सुविधा 24 तास कार्यरत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील , तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाद मागता येते. यावेळी शैक्षणिक सुविधाचाही उहापोह करण्यात आला.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीस सक्षम अधिकारी यांनी आपल्या सोबत संचिका फाईल सोबत ठेवावी. तसेच त्याचा अहवालही यासोबत पाठविण्यात यावा. ग्राहकांचे प्रश्न तात्काळ सोडविता यावेत यासाठी पाठपुरावाही करण्यात यावा. तसेच समिती सदस्यांनी समन्वयाने कामे करावीत , असेही राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले.  या बैठकीत विविध विषयांची जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी सादरी करणाद्वारे माहिती यावेळी दिली.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...