Friday, June 1, 2018


खरीप हंगाम 2018 :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभागासाठी 24 जुलैपूर्वी अर्ज करावेत
कृषि कार्यालयाचे आवाहन   
नांदेड, दि. 1 :- खरीप 2018 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 24 जुलै 2018 पूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले.  
या योजनेंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार असून ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. नांदेड जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ व कापूस या पीकांचा समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै 2018 अंतिम दिनांक आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
 पीक
विमा संरक्षीत रक्कम रुपये / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता ( रुपये )
भात
37,000/-
740/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
31,500/-
630/-
मुग
18,900/-
378/-
उडीद
18,900/-
378/-
सोयाबीन
42,000/-
840/-
तीळ
23,100/-
462/-
कापुस
42,000/-
2,100/-

या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असून खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित केला आहे. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...