Friday, March 23, 2018


कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना
31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी ;
एकवेळ समझोता योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 23 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज करण्यापासून वंचित शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in पोर्टलवर शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता योजनेंतर्गत हिश्याची दीड लाखावरील रक्कम शनिवार 31 मार्च 2018 पूर्वी बॅंकेत जमा करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
या योजनेंतर्गत जे शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधीत अर्ज अपलोड करण्यात येणार आहे.  आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत:  नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 
000000

No comments:

Post a Comment